🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. हनुमान चालीसा पठणाचा विषय अजूनही गरम असताना पाहायला मिळत आहे. यावरून विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच आता बच्चू कडू यांनी यात उडी घेतली आहे. तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. आता प्रत्युत्तर देत अतुल भातखळकरांनी जोरदार प्रहार केला आहे.
“शिवसेनेची दादागिरी ही प्रामाणिकपणाची आहे. ‘मातोश्री’ हे शिवसेनेचं श्रद्धास्थान आहे. त्याला ललकारण्याचा प्रयत्न शिवसैनिक कसे सहन करणार? दुसऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या राणा दाम्पत्याला लाज वाटायला हवी. जेलमध्ये राणा दाम्पत्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानायला हवेत. आता राणा दाम्पत्याला तक्रार करण्यासाठी दिल्ली हेच एकमेव ठिकाण उरलं आहे. त्यांनी सरकारी कार्यालयात तक्रार केली तरी त्याची दखल भाजपच्या कार्यालयातून घेतली जाते,” असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.
नवनीत राणांनी तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून सरकारचे आभार मानावेत इति बच्चू कडू.
सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज किती चढावा याचे आदर्श उदाहरण महा विकास आघाडी सरकार आहे.
जनता मतपेटीद्वारे या किडुकमिडुक माजोरड्यांना आपटायला उत्सुकतेने वाट बघते आहे. pic.twitter.com/fCjDw78hwS— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 11, 2022
आता याला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “नवनीत राणांनी तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून सरकारचे आभार मानावेत असे बच्चू कडू म्हणाले. पण सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज किती चढावा याचे आदर्श उदाहरण महाविकास आघाडी सरकार आहे. जनता मतपेटीद्वारे या किडुकमिडुक माजोरड्यांना आपटायला उत्सुकतेने वाट बघते आहे”, असा प्रहार केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
