🕒 1 min read
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी त्यांनी वाहतूक विकाससंबंधी मोठी घोषणा केली आहे.
पुढील आर्थिक वर्षात २५ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवले जाणार (25000 km of national highways will be built) आहेत. तसेच येत्या तीन वर्षांत ४०० नव्या वंदे भारत ट्रेन धावतील, उत्तम ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रवासी सवारीचा अनुभव असलेल्या या ४०० नव्या वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील. तसेच सुरक्षा आणि क्षमता वाढीसाठी 2,000 किमी रेल्वे नेटवर्क स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान कवच अंतर्गत आणले जाईल, असेही (2,000 km of railway network will be brought under indigenous world class technology armor) त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान शहरी भागात सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी शून्य जीवाश्म इंधन धोरणासह विशेष मोबिलिटी झोन आणले जातील. तसेच शहरी भागातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन ‘बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी’ आणली जाईल. असेही निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. वाहतूक विकास संबंधी हा सर्वांत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Budget 2022 : मानसिक आरोग्याच्या समस्यासाठी ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ’ कार्यक्रम सुरू केला जाईल- निर्मला सीतारामन
- Budget 2022 : केमिकल फ्री शेतीला प्रोत्साहन देणारे-अतुल भातखळकर
- हॉकी प्रो लीग: भारतीय महिला संघाकडून चीनचा ७-१ने पराभव
- “अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दोन वर्ष फुकट गेली, याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार”, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
- “मुख्यमंत्री दारात वाईन… मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार?”, चित्रा वाघ यांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
