Share

भारतासाठी ‘जुमला’ चीनसाठी ‘नोकरी’; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Published On: 

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) विविध मुद्द्यावरून मोदी सरकारला निशाण्यावर धरत असतात. कधी महागाई, कधी बेरोजगारी तर कधी तरुणांच्या भविष्यावरून मोदी सरकारवर टीका करत असतात. आता त्यांनी ‘मेड इन इंडिया’ या मोहिमेवरून मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi) निशाणा साधला आहे.

भारतासाठी ‘जुमला’ आणि चीनसाठी ‘नोकऱ्या ‘अशी स्थिती केंद्रातील मोदी सरकारने करून ठेवली आहे. मोदी सरकारने असंघटित क्षेत्र आणि सर्वात जास्त नोकऱ्या निर्माण करणारे MSMEs क्षेत्र नष्ट केले आहेत. आणि याचा परिणाम म्हणजे
‘मेक इन इंडिया’ मोहीम म्हणजे ‘चीनकडून खरेदी’ अशी परिस्थिती झाली आहे. मोदी सरकारने २०२१ मध्ये ४६ टक्के आयात चीनकडून केली.बेरोजगारीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ५० वर्षांतील सर्वात जास्त बेरोजगारी आज भारतात आहे. मोदींनी ‘मेक इन इंडिया’ , ‘स्टार्ट अप इंडिया’ मोहिमेबद्दल गाजावाजा केला. मात्र मोदी सरकरने लघु उद्योग, छोटे उद्योग यांचा पैसा घेऊन लाखो-करोडपती, अब्जपती यांना वाटून दिला. असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.

दरम्यान १ फेब्रुवारीरोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ संसदेत सादर केला. यावरूनही शेतकरी, सामान्य जनता, तसेच तरुणांसाठी अर्थसंकल्पात काहीही केले नसल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे. आता त्यांनी ‘मेड इन इंडिया’ मोहिमेवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!