Share

येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ‘प्रहार’चा असेल – बच्चू कडू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जवळपास २१० आमदारांचे मतदान पार पडले आहेत. यात महाविकास आघाडी कडून ६ तर भाजपकडून ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १० जागासाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे आता दहाव्या जागी महाविकास आघाडीचा विजय होतो का ? भाजप बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दरम्यान याच निवडणुकीच्या पार्शभूमीवर बोलताना राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी एक मोठे विधान केले आहे.

येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा प्रहार संघटनेचा असेल, असे मोठे विधान बच्चू कडू यांनी केली आहे. आज विधानपरीषेदेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणूक बाबतही भाष्य केले आहे. यावेळी महाविकास आघाडीला यश मिळेल असे त्यांनी सांगितले.

येणारा काळ अपक्ष आणि लहान पक्षांचाच राहणार आहे. आम्ही बोलू तसेच सरकार चालणार आहे. याचा परिणाम या निवडणुकीत दिसणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीच्या बाजूने राहून, दुसऱ्या बाजूला फटका बसणार आहे. पुढच्या वेळेसही आमचं राज्य येणार आहे, म्हणचे प्रहारचं, असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!