Share

“भाजपचा पोकळ आत्मविश्वास, दूध का दूध – पाणी का पाणी होईल” भास्कर जाधवांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जवळपास २१० आमदारांचे मतदान पार पडले आहेत. यात महाविकास आघाडी कडून ६ तर भाजपकडून ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १० जागासाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे आता दहाव्या जागी महाविकास आघाडीचा विजय होतो का ? भाजप बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी निवडणुक प्रक्रियेवर भाष्य केले आहे.

भास्कर जाधव म्हणाले, मतदान प्रक्रिया आता संपत आली आहे. शिवसेना गटा – गटानं मतदान करत आहे ही गोष्ट खरी आहे. मागील वेळी काही उणिवा आमच्याकडून राहिल्या त्यामुळं भाजपचं फावलं आणि त्यांचा निवडून न येणारा उमेदवार ही निवडून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सर्व प्रक्रियेवर स्वतः लक्ष ठेऊन आहेत. विधानपरिषदेसाठी मतदानाचा कोटा आता सांगण्यापेक्षा, चार तास राहिले आहेत. मतमोजणीत मतांचा कोटा किती आहे ते कळेल,असं भास्कर जाधव म्हणाले.

भाजपचा पोकळ आत्मविश्वास आहे. बाहेर संभ्रम निर्माण करायचा, वातावरण निर्माण करायचा, हवा निर्माण करायची भाजपची कार्यपद्धती आहे. चार तासानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे स्पष्ट होईल, असेही भास्कर जाधव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!