Share

Devendra fadnavis | “…त्यांना ओबीसी आरक्षण द्यायचेच नव्हते”; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

नवी मुंबई : भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ओबीसी आरक्षण, भोंगे प्रकरण, आरे कारशेड, हिंदुत्व आणि अशा अनेक मुद्द्यांवर आज फडणवीस बोलले. महाराष्ट्रातील (महाराष्ट्र) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी (इतर मागासवर्ग) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आरक्षणासाठी आवश्यक असलेली तिहेरी चाचणी पूर्ण झाल्याचे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 2 आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यास सांगितले. यावरून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु असतानाच फडणवीसांनी आजही या मुद्द्यावर भाष्य केलं.

भाजपचे सरकार आल्यावर आम्ही ४ महिन्यांत ओबीसी आरक्षण देऊ असे, असे भाजपचे नेते म्हणाले होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर केवळ २० दिवसात ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाली. याच संदर्भात फडणवीस म्हणाले कि, “जे काम कुणीही सहज करू शकतो, ते महाविकास आघाडी सरकारला 2.5 वर्ष का जमले नाही?, कारण त्यांच्यात इच्छाशक्ती नव्हती. केवळ राजकारण करण्यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही. ओबीसी आरक्षण त्यांना द्यायचेच नव्हते”.

दरम्यान यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाबरोबरच मराठा आरक्षणावरही वक्तव्य केलं. “मराठा आरक्षणाची लढाई सुद्धा आपण लढू. थोडा दीर्घ लढा आहे. पण तोवर आपल्या काळात सुरू झालेल्या ज्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या, त्या पुन्हा सुरू करून त्याला अधिकाधिक निधी देण्याचे काम केले जाईल”, असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!