मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने २-१ असे पुनरागमन केले आहे. या मालिकेत आतापर्यंत भारतीय कर्णधार यष्टीरक्षक ऋषभ पंतची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. केएल राहुलच्या दुखापतीनंतर या मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद त्याच्या हाती देण्यात आले होते. सलग दोन सामने गमावल्यानंतर संघाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून पुनरागमन केले आहे. मात्र कर्णधार पंतच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा झाली नाही. याबाबत माजी दिग्गज कपिल देव चांगलेच संतापले आहेत. त्यांनी त्यांच्या विश्वचषकातील यष्टीरक्षकांच्या यादीतून पंतला वगळले आहे.
भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा ऋषभ पंत आतापर्यंत टी-२० मध्ये स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. लागोपाठ संधी मिळूनही तो धावा करू शकला नाही. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे यष्टिरक्षकाची जागा सर्वांच्याच नजरेत आहे. ऋषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन आणि आता दिनेश कार्तिक यांनीही या जागेसाठी दावा ठोकला आहे.
वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार कपिल म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, जर मला सांगितले की तुम्ही तिघांपैकी कोणत्याही एका (दिनेश कार्तिक, इशान किशन आणि संजू सॅमसन) यष्टिरक्षकांची निवड करा. तर मला वाटते की ते जवळजवळ समान स्तराचे आहेत. तिघांमध्ये खूप फरक दिसत नाही. पण फलंदाजीच्या बाबतीत प्रत्येक जण एकमेकांपेक्षा खूपच सरस वाटतो.”
“या तिघांपैकी तिघेही भारतीय संघासाठी स्वबळावर सामने जिंकू शकतात. जर तुम्ही ऋद्धिमान साहाबद्दल बोलले तर, तो या तिघांपेक्षा खूपच चांगला आहे, पण जेव्हा फलंदाजीचा विचार येतो तेव्हा इतर तिघांपैकी तिघेही त्याच्यापेक्षा बरेच चांगले आहेत. मी संजू सॅमसनबद्दल खूप निराश आहे. तो खूप प्रतिभावान आहे पण हा खेळाडू दोन सामन्यांमध्ये धावा करतो आणि नंतर अपयशी ठरतो. त्यांच्यात सातत्य नसल्याचे दिसते.”
महत्वाच्या बातम्या:


