🕒 1 min read
मुंबई : आशिया कप २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. विराटचा आयपीएल नंतर इंग्लंड दौराही चांगला राहिला नव्हता. या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या २० धावा अशी होती. यानंतर विराटला वेस्ट इंडिज दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती. आयपीएल २०२२ हंगाम विराट कोहलीसाठी चांगला राहिला नव्हता. त्याने आयपीएलमध्ये २२.७३ च्या सरासरीने ३४१ धावा केल्या होत्या. इंग्लंड दौऱ्यावर त्याने कसोटीत ११ आणि २० धावा, टी-२० मध्ये १,११ आणि २ तर एकदिवसीय सामन्यात १६ आणि १७ अशा धावा केल्या होत्या.
आशिया चषकची सध्या सर्वच संघांकडून तयारी सुरू झाली आहे. विराट कोहलीच्या पुनरागमनाबद्दल माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विराट कोहलीसाठी आशिया चषक खूप खास असल्याचे म्हटले आहे. एका स्टार स्पोर्ट्स शोमध्ये बोलत असताना ते म्हणाले, ‘विराट कोहलीसाठी आशिया चषक नक्कीच खास असणार आहे. ते म्हणाले की बाकीचे फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. एकूणच आशिया चषकासाठी निवडलेला संघ चांगला असून त्यात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, असेही ते म्हणाले. आर अश्विन गोलंदाजीसोबतच चांगली फलंदाजी करत आहे. अक्षर पटेलने देखील वर्षभरात चांगली फलंदाजी केलेली आहे.
गोलंदाजी लाइनअपबाबत किरण मोरे म्हणाले की, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांच्या निवडीमुळे तो खूश आहे. रवी बिश्नोईच्या आगमनाने संघात विविधता येईल, असे ते म्हणाले. अर्शदीपबाबत ते म्हणाले की, आम्ही डाव्या हाताच्या गोलंदाजाच्या शोधात होतो आणि तो शोध अर्शदीपमध्ये संपला आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकावीरही ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Kishori Pednekar । “पक्षात दोन-तीन महिला आहेत, त्यापैकी एकही लायक नाही का?”, मंत्रीमंडळ विस्तारावरून किशोरी पेडणेकर संतप्त
- MNS on Sanjay Rathod | “मंत्रिमंडळातील ‘संजय’ सरकारचे जहाज बुडवेल” ; मनसेची खोचक टीका
- PM Modi : रवींद्र जडेजा सध्या क्रिकेट खेळत नाही, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का केले कौतुक? वाचा!
- Nana patole | भ्रष्टाचार करणाऱ्यांना मंत्रिपद, यातून भाजपाचा खरा चेहरा दिसतो – नाना पटोले
- Asia Cup 2022 : आशिया चषकसाठी भारतीय संघ निवडीवर माजी कर्णधार नाराज, म्हणाला…!


