🕒 1 min read
मुंबई : काही वर्षापूर्वी मराठा आरक्षणाचा लढा आक्रमकतेने सुरु होता. मराठा आरक्षणाचा लढा देत असताना अनेकांनी बलिदान दिले. या आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी याचीही मागणी वारंवार केली गेली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचेही राजेशे टोपे यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या नातेवाईकांना 10 लाखांचे अर्थसहाय्य केले होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिले होते. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
सतत पाठपुरावा केल्याने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला.बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने आज 10 लक्ष रुपये मदत वितरित केली आहे. pic.twitter.com/shelDMkDHs
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 29, 2021
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. राजेश टोपे यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरुन शेअर केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- समीर वानखेडेंनी केली कामाला सुरुवात; ‘या’ ठिकाणी टाकली धाड
- ‘द्रविडची प्रशिक्षकपदी निवड झाली तेव्हाच विराटला कर्णधारपदावरून हटवणार हे निश्चित होतं
- मुलाच्या आठवणीत शिखर धवनने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट
- ‘एसटी संप चिघळवून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा डाव’
- ‘महाराष्ट्राचा मुस्लिम हातात तिरंगा घेऊ शकत नाही का?’
- प्रणवदांच्या सल्ल्याशिवाय सोनिया गांधी कोणताही निर्णय घेत नसत-छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
