Share

औरंगाबाद-जळगाव महामार्ग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: औरंगाबाद-जळगाव महामार्ग मागील दोन तीन वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता पुन्हा एकदा फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा-फुलंब्री-खुलताबाद महामार्ग क्रमांक ७५२ या सुरु असलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजहर सय्यद व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुक्याध्यक्ष मंगेश साबळे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केला आहे.

या निवेदनात म्हटलं आहे की, संबंधित कामात अनिमितता आढळून येत आहे. या रस्त्याची उंची ३०० एमएम बंधनकारक असताना हे काम १५० एमएम इतकीच उंची आहे. रस्त्याची पिक्यूसी देखील फाटत आहे. रस्त्यातून गवत उगवत आहे. त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे सिमेंट व लोखंड या कामासाठी वापरण्यात येत आहे. या कंपनी व अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याने वारंवार तक्रार करून देखील काहीच कारवाई होत नाही, असा आरोप देखील करण्यात आला आहे.

संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा याबाबत अंशतः लॉकडाऊन संपताच ५ एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सय्यद व साबळे यांनी दिला आहे. त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!