🕒 1 min read
मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर शंभरी ठोकली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हा चित्रपट पहावा असा आग्रह करत आहेत, आता आमिर खानने देखील या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आमिर खान एस.एस. राजामौलीचा चित्रपट ‘RRR’ च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये गेस्ट म्हणून दिल्लीला गेला होता. त्यावेळी त्याने विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल काही गोष्टीही सांगितल्या. तो म्हणाला ‘मी काश्मीर फाइल्स नक्कीच पाहीन, कारण तो आपल्या इतिहासाचा असा भाग आहे, की ज्याने हृदयात वेदना होतात.
चित्रपटाबद्दल आमिरने अनेक गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत. तो म्हणाला, “काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं ते निश्चितच अत्यंत खेदजनक आहे. या विषयावर तयार झालेला असा चित्रपट प्रत्येक भारतीयाने नक्कीच पाहिला पाहिजे आणि माणसावर अत्याचार झाल्यावर त्याला कसं वाटतं हे प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवलं पाहिजे.’ तो पुढे म्हणाला, ‘या चित्रपटाने मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावनांना स्पर्श केला आहे आणि हेच त्याचं सौंदर्य आहे. हा चित्रपट मी नक्कीच पाहीन आणि हा चित्रपट यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
