संगमनेर : संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे तब्बल सात किलोचे रताळ सापडले आहे. यामुळे या रताळ्याची राज्यात चर्चा होत आहे. हा निसर्गाचा चमत्कार सावरगावतळ येथील हिराबाई नेहे या आजिबाईंच्या शेतात झाला आहे.
हिराबाई नेहे यांचे शेत अतिशय हलक्या प्रतीचे म्हणजेच मुरमाड प्रकारचे असुन मागील वर्षीच्या खरिपाच्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी कांदा पीक लावले होते.त्या पिकाच्या कडेला त्यांनी हा “रताळे” चा वेल लावला होता. जेथे आता तीन चार महिन्यापासून कोणतेही पीक नाही, त्यामुळे तेथे पाणी देण्याचा प्रश्नच नसतांना त्या एकाच रताळ्याच्या वेलाला जमिनीत एकच सात किलो वजनाचे “रताळयाचे” कंद आले आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे खत, औषध किंवा चार महिन्यापासून पाणी सुद्धा नसतांना ते आले त्यामुळे या सात किलोच्या रताळ्याची चर्चा राज्यभरात होत असताना पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

