Share

“महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही विकृत मनोवृत्ती कामाला” ; रुपाली चाकणकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : “राज्यात कोणतही संकट आलं तरी महाराष्ट्र एकसंध होतो, लढतो आणि जिंकतो. मात्र या शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही विकृत मनोवृत्ती राज्यात आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या शांततेला बाधा पोहचत आहे,” असे वक्तव्य राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. कोल्हापूरमध्ये चाकणकर या पत्रकारांशी बोलत होत्या. सध्या महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण केले जात असून, विरोधकांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत, असेही चाकणकर म्हणाल्या. मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा देण्याऱ्या नवनीत राणा व रवी राणा या दाम्पत्याच्या आक्रमक भूमिकेवर त्या बोलत होत्या.

महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, राज्यात कोणतही संकट आलं तरी महाराष्ट्र एकसंध होतो, लढतो आणि जिंकतो. ज्यांना काम करायचं नाही आणि इतरांना ही करू द्यायचे नाही, त्यांच्याकडून असले प्रकार सुरु आहेत. प्रत्येक पक्षाचे संस्कार असतात. आणि ते त्त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतात, असा टोला ही चाकणकर यांनी भाजपला लगावला.

मातोश्री निवास्थानाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे. त्यातच राणा दाम्पत्य हे हनुमान चाळीसासाठी आग्रही होते. परंतु आता राणा दाम्पत्याने माघार घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!