Share

“पिंजऱ्यात बसून डरकळ्या फोडायच्या”; सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोविड नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार मातोश्रीतुनच पाहत होते. अनेक कार्यक्रम त्यांनी ऑनलाईन पार पाडले. मुख्यमंत्री तब्बल दीड वर्षानंतर मंत्रालयात दाखल झाले होते, यावरूनच त्यांच्यावर विरोधी पक्ष व त्यांच्या नेत्यांकडून वारंवार टीका करण्यात येत होती. आता या पाश्वर्भूमीवरून आज राजापूरमधील तुळसवडे येथे बोलताना सदाभाऊ खोत यांनी देखील जोरदार टीका केली आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, “शिवसेनेने जे कडवं हिंदुत्व धारण केलेलं होतं, ते मुख्यमंत्र्यांचं कडवं हिंदुत्व राहिलेलं नाही. मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांचं हिंदुत्व नामोहरम झालेलं आहे.”

पुढे बोलताना म्हणाले, राज ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून ते तयार झालेलं रसायन आहे. हिंदुत्वाला फुंकर घालण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे, त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोणकोण भस्म होतं, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल.

गेल्या लोकसभेमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ असं म्हटलं की राष्ट्रवादीचे सगळे नेते हे माकडासारखे टाळ्या वाजवत होते, आणि आज तेच राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबरोबर स्टेजवरची टाळ्या वाजवणारी राष्ट्रवादीची माकडं रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवत फिरायला लागलेली आहेत. याच्या एवढी शोकांतिका या राजकारणामध्ये असू शकत नाही, अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!