मुंबई: पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी जीव गमावले आहेत. तरीही यावर ठोस उपाययोजना शिवसेना करू शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मूळ समस्येकडेपण लक्ष दिले पाहिजे, असं पत्र भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. नितेश राणेंच्या या पत्रावरुन शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“राजकारणातली फारशी समज नितेश राणेंना नाही. राजकारणात अपरिपक्वता वाढत चाललीये. मुख्यमंत्री यांना थेट तुम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा आयुक्तांना प्रश्न विचारा. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पब्लिसिटी करून घेताय. आयुक्तांना मर्जीत ठेवायचं, काम करून घ्यायचं आणि यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचं. प्रत्येकाला टीआरपी हवी आहे”, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
नितेश राणे पत्रात काय म्हणाले ?
मुंबईत ३८६ फ्लडींग पाईंट आहेत. तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप देण्यापलिकडे आपण काय केले आहे? का यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात? @mybmc @CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/vlo5v93ykI
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 16, 2022
“तुंबणाऱ्या या मुंबईत ३८६ असे धोक्याची ठिकाणे आहेत. ज्याला आपण फ्लडिंग पॉईंटस म्हणतो. यापैकी २८ ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त माटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील २५ फ्लडिंग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २२ दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग २५० मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे”, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
“पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडींग पॉईंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीचं तोंड द्यावं लागेल. या फ्लडींग पाईंट्सजवळ पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत?, हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे. राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात?”,असा टोला देखील राणेंनी लगावला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

