Share

घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही; शरद पवारांचा कोश्यारींवर प्रहार

Published On: 

बारामती : महराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अनेक दिवस उलटल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. ‘महाराष्ट्राच्या इतिहासात घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पहिला नाही’ अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली.

माळेगाव ता. बारामती येथे गोविंदबाग या निवासस्थानी राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केल आहे. ‘राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. घटनेनुसार राज्यसरकारने केलेल्या शिफारशींना मान्यता देणे ही राज्यपालांची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीची आणि घटनेत असणारी जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी महाराष्ट्राने पहिला नाही. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा तत्कालीन राज्यपालांनी त्रास दिला होता. आता तशाच प्रकारे भगतसिंग कोश्यारी वागत आहे. मात्र, केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, हे चिंताजनक आहे, अशी टीका शरद पवारांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!