Share

Devendra Fadnavis | गेल्या अडीच वर्षात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती – देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वा राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केले जात आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीपासून ते खातेवाटपापर्यंत अनेक मुद्यांवरून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अडीच वर्ष ज्यांनी काहीही केले नाही, ते आज आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. माझे त्यांना एवढेच सांगणे आहे की 5 वर्ष आमचे सरकार होते. सरकार कसे चालते, हे आम्ही दाखवून दिले. आता पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो आहोत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अडीच वर्षात ७०० रुपये बोनस देतो असे सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही. आपण त्याच वेळी सांगितले होते की लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नाही. हे लबाडच निघाले. पण आजच मुख्यमंत्र्यांसोबत मी बोनस देण्यासंदर्भात चर्चा करेन. आपले सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!