Share

Raosaheb Danve| “…तिथे फोनवर बोलताना ‘वंदे मातरम’ म्हणणं चुकीचं नाही”; दानवेंनीही केले समर्थन

Published On: 

जालना : आता शासकीय कार्यालयात फोन आल्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमस्कार ऐवजी वंदे मातरम म्हणावं लागणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतलाय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या निर्णयाचं स्वागत करत या निर्णयाचं समर्थन केलंय. फोनवर नमस्कार ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्यात गैर काय असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केलाय.

शिवाय ज्याला देशाप्रती स्वाभिमान आहे ते वंदे मातरम म्हणतील. मात्र असा कोणताही अध्यादेश सरकारने काढला नाही असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. या निर्णयाला रजा अकादमीने विरोध केलाय. यावर देखील दानवे यांनी भाष्य करत ज्याला विरोध करायचा आहे त्याला फोनवर काय म्हणायचे आहे ते म्हणावे.  पण मुनगंटीवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. असं सांगत दानवे यांनी या निर्णयाच समर्थन केल. विनायक मेटे यांचं अपघाती निधन ही दुर्दैवी घटना आहे.हा अपघात आहे की घातपात याची पोलीस चौकशी करत असून ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच हा घातपात आहे की नाही याचा सुगावा लागेल असं दानवे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!