Gajanan Kale । मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून आदित्य ठाकरे मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरवात केली आहे. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात देखील शक्तीप्रदर्शन करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून सुरुवात झाली आहे. शिवसेना पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. मात्र यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरे यांना टोमणा मारला आहे.
गजानन काळे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. ट्विटमध्ये ते म्हणाले कि, आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर काळे यांनी शिवसेनेला शिल्लकसेना असे म्हणत हिणवलं आहे. छोटे नवाब यांनी काढलेल्या निष्ठा यात्रेचे उलट परिणाम दिसू लागलेत. यांचा पक्ष सोडू लागलेत. त्यामुळे त्यांना आता शिल्लकयात्रा काढावी लागणार असं दिसतंय, असं देखील काळे म्हणाले.
छोटे नवाब यांच्या 'निष्ठा यात्रेचे'तर उलटे परिणाम दिसू लागलेत… आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते,जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांचा पक्ष सोडू लागले … आता यांना लवकरच 'शिल्लक यात्रा'काढावी लागणार असं दिसतंय … #शिल्लकसेना
— Gajanan Kale (@MeGajananKale) July 15, 2022
दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकत वाढू लागली आहे. आमदारांनंतर सुरवातीला ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. तसेच पुढे कल्याण डोंबिवलीतील ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेंना समर्थन दिल आहे. तसेच शिवसेनेचे १४ खासदार देखील एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत – संजय राऊत
- Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता सेन आणि ललित मोदी बांधणार ‘लग्नगाठ’; सोशल मीडियावर तुफान चर्चा
- Virat Kohli | BCCI चा मोठा निर्णय! टीम इंडियातून विराट कोहलीची हकालपट्टी?
- Sanjay Raut : औरंगजेब सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला?, नामांतर निर्णय स्थगितीवरून संजय राऊतांचा सवाल
- Breaking News : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार


