🕒 1 min read
नागपूर: गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात आत्तापर्यंतचे सर्वात मोठे बंड झाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी त्यांची साथ सोडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारले आणि जवळपास 40 हुन जास्त आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आज एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. या घटनेला अनेक दिवस उलटूनही राज्यात अजूनही शिवसेनेत झालेल्या बंडाची चर्चा आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.
“ते बंड आता विसरून जा, कारण शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे. शिवसेना हा पक्ष ५६ वर्ष काम करत आहे. या काळत आम्ही अनेक वादळं पहिली, अनेक संकट आली, पण शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे. आता जे काही दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे तो केवळ भास आहे.”, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Uddhav Thackeray : लढाईला तयार राहा, शिवसेना मजबूत हे दाखवून द्या; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
- Sadabhau Khot | “…मंत्री मंडळात वाडप्यांची गरज नाही” – सदाभाऊ खोत
- India vs England, 2nd ODI | रोहित शर्माने टॉस जिंकला, भारत करेल प्रथम गोलंदाजी
- Navneet Rana : ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं; नवनीत राणांची सडकून टीका
- Jayant Patil | “कोकणात आल्यानंतर शरद पवारांच्या गाडीत बसून…” ; जयंत पाटलांचा केसरकरांवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
