Share

‘अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली, आज खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या मोठ्याप्रमाणावर चर्चेत आहे. ‘मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे’, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. तर यावरूनच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी खासदार अमोल कोळे यांच्यावर टीका केली आहे.

भविष्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, या भौतिक प्रश्नात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रस नाही. आताच्या घडीला महापूर अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली आहे, मग आज खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब? असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत केला आहे.

दरम्यान पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत कोल्हे यांनी हे वक्तव्य केलं. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आल्याचं कोल्हे म्हणाले. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, ही माझी भावना आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!