🕒 1 min read
जालना : मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय लागताच साष्टपिंपळगाव येथील आंदोलनकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ दिवसात जर सरकार अध्यादेश काढणार नसेल तर कोणत्याही नेत्याला रस्त्याने फिरू देणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागताच इथल्या आंदोलनकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करत आंदोलन सुरू केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या नियमांचे उलंघन केल्यामुळे या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. २५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास वचन दिले होते की येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या मागण्यांना मंजूरी देऊ. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून ग्रामस्थांची कुठलीही विचारपूस करण्यात आलेली नाही.
राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थगित करण्यात आले होते. मात्र, या संबंधी अंतिम सुनावणी पाच न्यायाधिशांच्या पीठासमोर झाली. यामध्ये आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे.
या निकालामुळे उद्विग्न झालेल्या आंदोलनकर्त्यांची थेट रास्ता रोको करत आपला संताप व्यक्त केला. पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला . मात्र, आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. कोरोनामुळे संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. यात मनोज जरांगे पाटील, शहादेव आवटे, मुक्ताबाई ढेपे, संतोष ढवळे यांना यावेळी अटक करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजातील सरदारांमुळेच मराठा समाज आजपर्यंत आरक्षणापासून वंचित – सदाभाऊ खोत
- ‘पत्रकार परिषदेत ढळढळीत खोटं बोलल्याने मराठा समाज तुम्हाला माफ करेल असे समजू नका’
- ‘निलंग्यातील तहसीलदारांना निलंबित करा’, कोरोना मृत्यूवरून सर्वपक्षीय नेते आक्रमक
- महत्त्वाचा निर्णय! राज्य सरकारचे नवीन ‘पोषण कार्ड’, स्थलांतरित मातांसह अपत्यांना फायदा
- औरंगाबादेत लवकरच हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट, आदित्य ठाकरेंचा पुढाकार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

