मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मराठा आरक्षण रद्द केल्याच्या कोर्टाच्या निर्णयावरुन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर आणि मराठा नेत्यांवर टीका केली आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आरक्षणाबाबत भक्कम बाजू मांडली नाही असा आरोप त्यांनी केलाय. मराठा समाजातील सरदारांमुळेच मराठा समाज आजपर्यत आरक्षणापासून वंचित राहिलाय, अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या या सरदारांना आपली सरदारकी धोक्यात येईल अशी भीती असल्याने त्यांनी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असंही ते म्हणाले.
तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मराठा समाजाला मोठा दुखद धक्का बसला आहे. मराठा समाजात मागासलेल्या लोकांना भारतीय घटनेनुसार आरक्षण देण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली त्याचवेळी संशय आला होता. तामिळनाडू आणि कर्नाटक दोन्ही राज्यात 52 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. मात्र मराठा आरक्षण रद्द करणे अत्यंत दुर्दैवी आहे, असं भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निलंग्यातील तहसीलदारांना निलंबित करा’, कोरोना मृत्यूवरून सर्वपक्षीय नेते आक्रमक
- महत्त्वाचा निर्णय! राज्य सरकारचे नवीन ‘पोषण कार्ड’, स्थलांतरित मातांसह अपत्यांना फायदा
- औरंगाबादेत लवकरच हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट, आदित्य ठाकरेंचा पुढाकार!
- पालकांना दिलासा! शाळांनी फीमध्ये १५ टक्के कपात करावी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- ‘राज्य व केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
