मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा रंगलेला विषय म्हणजे भाजपविरोधात आघाडीची मोट बांधणे. यामध्ये काँग्रेसशिवाय मोट बांधणे अशक्य असल्याचे वक्तव्य राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी काँग्रेसबाबात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीपासून स्पष्ट भूमिका घेतल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसशिवाय देशातील विरोधी पक्षांची मोट बांधण अशक्य आहे, असं मत शरद पवारांचे आहे. काँग्रेससह नॉन युपीएच्या खासदारांची संख्या 150 आहे, यांना पण सोबत आणणे गरजेचं आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
आगामी काळात काँग्रेससकट सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी होईल. त्याचं नेतृत्व कोण करेल हा विषय आत्ता महत्वाचा नाही. सामुहिक नेतृत्व असेल. काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजुट शक्य नाही. हे आधीपासून गेल्या वर्षभरापासून शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. आम्हीदेखील हेच म्हणत आहोत. ममता बॅनर्जींचेही तेच म्हणणं आहे. सर्व विरोधक एकजूट केले पाहिजेत. निश्चितच आम्ही त्यानुसार काम करु, असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सगळ्यांच्या एकजुटीने मोर्चाबांधणी करुन एक पर्याय देशात निर्माण करुन देऊ. निश्चितच 2024 ला आगामी लोकसभेची निवडणुका येतील तेव्हा देशात परिवर्तन होणार, असंही नवाब मलिकांनी माध्यामांशी बोलताना स्पष्ट सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- देवेंद्र फडणवीसांनी साहित्य संमेलनाला न जाण्यामागचं कारण केलं स्पष्ट
- अखेर कंगना शेतकऱ्यांपुढे झुकली; माफी मागितल्याने वातावरण जल्लोषमय!
- ‘ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये पण…’
- उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे मोठे वक्तव्य;म्हणाले,’भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या…’
- पंजाबमध्ये कंगनाचा निषेध करत शेतकऱ्यांनी गाडी आडवली; व्हिडिओ व्हायरल


