Share

…म्हणून मेनका गांधींनी माझी भेट घेतली; आव्हाडांनी केला त्या भेटीचा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे खासदार वरुण गांधी हे पक्षात नाराज असल्याच्या तुफान चर्चा असतानाच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार मेनका गांधी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीवरुन राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. मेनका गांधी यांनी जितेंद्र आव्हाडांची भेट का घेतली याचे कारण आता जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करताना अनेकदा अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी मुंबईत पूर्व तसेच पश्चिम उपनगर येथे जमिनीची उपलब्धता होऊ शकते. या जागेवर प्राण्यांच्या मृत्यूनंतर दफनासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

प्राण्यांच्या दफनासाठी मुंबईत जागा निश्चित करण्यासंदर्भात खासदार मनेका गांधी आणि माजी खासदार प्रितेश नंदी यांच्यासोबत आयोजित बैठक होती. ‘मुक्या प्राण्यांची सेवा करणे गरजेचे आहे. प्राणी आपली वेदना सांगू शकत नाहीत. रस्त्यावरील गाई, कुत्रे आणि अन्य प्राण्यांसाठी चौकोन पद्धतीने आखणी करून प्राण्यांचे पालन पोषणही करण्यात येईल’, असे, आव्हाड यांनी यावेळी सांगितले आहे.

मानव आणि प्राणी एकामेकांसोबत आनंदाने रहावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. याकरिता काही खासगी संस्थांचाही सहभाग असणार आहे, असे मेनका गांधी म्हणाल्या असल्याचे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!