Share

…आणि भारत सुद्धा जगाचा नकाशा बदलू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवले- जितेंद्र आव्हाड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आजचा दिवस(१६ डिसें.)संपूर्ण भारतात ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे १६ डिसेंबर १९७१ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले होते. या युद्धादरम्यान आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहींदांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. या पार्श्वभूमीवरच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत या युद्धात शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांना अभिवादन केले आहे.

ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की,’विजयी भव..आजची तारीख पण साल होते १९७१ चे, इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाने जागतिक महासत्ता विरोधात असताना देखील आपल्या सैन्य शक्तीवर विश्वास ठेवत जगाच्या राजकीय नकाशावर नवीन राष्ट्र निर्मिती केली आणि भारत सुद्धा जगाचा नकाशा बदलू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवले’, असे आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी देखील ट्वीट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताने विजय मिळवला, हा विजय केवळ भारताचा विजय नव्हता, तर क्रूरतेविरुद्ध मानवतेचा विजय होता. या विजयाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांना विनम्र अभिवादन.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!