🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कृषी कायदा अखेर मागे घेण्यात आला असून तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही विधेयके रद्द करण्यात आली आहेत. मात्र आज पुन्हा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Sigh Tomar) यांनी नागपूरमध्ये कृषी कायदे पुन्हा आणण्याबाबत वक्तव्य केले आहे.
वादग्रस्त तीनही कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. यानंतर संसदेतही विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यासोबत दिल्लीच्या सीमेवर वर्षभर ठिय्या आंदोलन करणारे शेतकरी पुन्हा आपल्या घरी परतले असताना कृषी कायदे पुन्हा आणण्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आम्ही कृषी सुधारणा कायदे आणले. पण काही लोकांना हे कायदे आवडले नाही. हे कायदे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोठे बदल घडवणारे होते, पण सरकार निराश नाही. शेतकरी आपल्या भारताचा कणा आहेत त्यामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतले. पुढेदेखील टाकू नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- रवी शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचे माजी क्रिकेटरने केले समर्थन
- “माझ्या अनेक मुद्द्यांना मंत्र्यांनी बगल दिली”, प्रविण दरेकरांचा आरोप
- ‘हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,समाधान,समृद्धी,उत्तम आरोग्य,प्रेम आणि अहिंसा घेऊन येवो’
- कोरोनाचे संकट लवकरच पूर्णपणे दूर व्हावे, हीच प्रभू येशू यांच्याकडे प्रार्थना- चंद्रकांत पाटील
- नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा क्षण- छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
