Share

Uddhav Thackeray | “अमित शहांनी तेव्हा फडणवीसांना थांबवले असते तर…”; – उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई  :  गणेशोत्सवामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेबाजी केली होती. तेव्हापासून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगली असल्याचं पाहयला मिळतं आहे. अशातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमिस शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलंय अग्रलेखात ?

अमित शहा यांना त्यांचे राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाहीने हा अधिकार सर्वांना दिला; पण भाजप व त्यांचे नेते लोकशाही मार्गाने जात आहेत काय? मग, शिवसेना फोडली कशासाठी?, असा सवाल करत शिवसेनेने अमित शहा यांना लक्ष्य केलं आहे. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात हे लिहिलं गेलं आहे.

तसेच, लोकशाहीचे चारही स्तंभ अस्थिर करून देशाचे नियंत्रण काही मंडळींनी हातात घेतले आहे. त्यांनी एका बाजूला ‘मिशन मुंबई’ तर दुसऱ्या बाजूला ‘मिशन बारामती’चे षड्डू ठोकले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खत्म करायचे व तोतयांच्या हाती हे राज्य सोपवायचे. मुंबईचा सरळ घास गिळायचा असा हा कट शिजला असल्याचंही त्यामध्ये म्हटलं आहे.

पुढे अग्रलेखात असंही लिहिलं आहे की, अमित शहा ‘मातोश्री’वर आले होते. त्यावेळी त्यांच्या समोरच सत्तेचे वाटप समसमान झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर जाहीर केले होते. त्याचवेळी अमित शहांनी फडणवीस यांना थांबवले असते तर बरेच झाले असते, असंही अग्रेलाखात म्हटलं गेलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!