Share

Ajit Pawar | TET घोटाळा आमच्या काळात झाला असले तरी चौकशी करा – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | नागपूर : अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याचा (TET scam) आरोप करत विरोधकांनी काल सभात्याग केला होता. अनेक मंत्र्यांनी टीईटीत भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे तसेच सरकार त्यांना पाठिशी घालत आहे व त्यांच्यावर कारवाई करत नाही या निषेधार्थ सर्व विरोधक सभात्याग करत असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण टीईटी भ्रष्टाचार महाविकास आघाडी सरकाच्या काळात झाल्याचे सांगितले. यावर आज अजित पवार यांनी आज सरकारला सवाल केला.

अजित पवार म्हणाले, “टीईटी घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस बोलले की हा घोटाळा मागच्या काळात झाला. पण माझे म्हणणे आहे की आमच्या काळात जरी घोटाळा झाला असला तरी पुरावे असतील तर चौकशी करा.”

अब्दुल सत्तार यांना क्लीन चिट-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, टीईटी भ्रष्टाचार कोणाच्या काळात झाला? त्या काळात कोणाचे सरकार होते? महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात टीईटी भ्रष्टाचार झाला. ज्याने लाखो तरुण बुडाले. ज्यामध्ये सनदी अधिकाऱ्यांसह अनेक लोक सामील होते. या प्रकरणात मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती.

अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, मात्र त्यांच्या एकाही मुलीची टीईटी अंतर्गत नियुक्ती झालेली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर टीईटी आयुक्तांनीही स्पष्टीकरण दिले आहे. पण, इथल्या कोणत्याही मंत्र्यावर बेलगाम आरोप करण्याची सवय आहे. आपल्या सत्तेच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार बाहेर काढणारा हा पहिलाच विरोधी पक्ष आहे. बॉम्ब-बॉम्ब म्हणत त्यांना लवंगी फटाकेही मिळाले नाहीत. अपात्र कंपनीला पात्र ठरवून TET परीक्षा कोणी घेतली?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या