Udayanraje Bhosale | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत असताना भाजप (BJP) नेते आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना अश्रू अनावर झाले. याबाबत भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. याच परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले.
त्याकाळात शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला. आज सर्व व्यक्तिकेंद्रीत झाले आहेत. कोणीच अपवाद नाही. राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष. असंच चालत राहीलं तर कितपत चालणार. या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.
तसेच, देश परदेशातून लोक येतात तेव्हा त्यांच्या कानावर शिवाजी महाराजांचं नाव पडतं. कशाला पाहिजे, जाऊ द्याना कशाला हवं बेगडी प्रेम. रेल्वे टर्मिनसला तरी का नाव द्यायचं. शिवजयंती तरी करा साजरी करायची?, असे सवाल करत हे बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. त्यांनी तोंडाला रुमाल लावला. कंठ दाटला. मेलो असतो तर बरं झालं असतं. अशा व्यक्तीविरोधात कारवाई करत नसाल तर कुणालाही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- MNS | “संजय राऊतांच्या रुपात हा कादर खान आता…”; मनसेचा जोरदार हल्लाबोल
- Bhagatsingh Koshyari | राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाकडून स्पष्टीकरण; म्हणाले,
- Raj Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का? – राज ठाकरे
- Supriya Sule | “राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी…”, सुप्रिया सुळेंचं विधान
- Sanjay Raut | राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होण्याच्या चर्चेवर संजय राऊत म्हणतात, “राजभवनाची खिंड…”


