🕒 1 min read
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकट आले आहे. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांची अट मान्य न केल्यास शिंदे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईत संजय राऊत यांच्या घरासमोर बॅनरबाजी दिसून येत आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि व खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक ट्विट केले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
संजय राऊत ट्विट करत म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने.
आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
