🕒 1 min read
Bihar | पटना : गेल्या आठवड्यात बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. यामध्ये जदयूने भाजपशी युती तोडली. नितीशकुमार यांनी राजद, काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करून यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. भाजपाने जेडीयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली होती. नव्या सरकारला १६४ आमदारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता बिहारमध्ये नितीशकुमार यांनी सावध भूमिका घेत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
यानंतर १० ऑगस्टला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. ते सात पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. या आघाडीला अपक्षांचा पाठिंबा आहे. महाआघाडीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, हम आणि डावे पक्ष आहेत. यानंतर आज राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव बुधवारी दिल्लीहून पाटणा येथे पोहोचले.
विमानतळ ते राबडी देवी यांच्या निवासस्थानापर्यंत कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमारही पोहोचले होते. यादरम्यान नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्यात चर्चा झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले कि, आम्ही एकत्र होतो, एकत्र आहोत आणि आमचे नाते खूप जुने आहे, असं ते यावेळी म्हणाले. लालू यादव यांच्या भेटीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- Assembly Session 2022 | महाराष्ट्राच्या इतिहासात शिंदे हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले – छगन भुजबळ
- BJP । भाजपच्या या माजी केंद्रीय मंत्र्यांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार
- Monsoon session | “आता फक्त भाषणांवर जीएसटी लावायचा बाकी”; भुजबळांचा टोला
- Eknath Shinde | सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Ashish shelar | “शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या माईकचा आवाज कुठे रेकॉर्ड होतोय का?”; आशिष शेलारांना संशय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
