Share

Bachchu Kadu | “जो उशिरा आला त्यांना पहिल्या पंगतीत बसवले आणि…” – मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आमदार बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यावर जावून भेट घेतली. आधी ही भेट केवळ विकास कामांसाठी घेत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले मात्र भेटीनंतर त्यांनी मंत्रिपदाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. यावेळी त्यांची नाराजी प्रकर्षाने दिसून आली. जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले. आणि जो पहिला गेले त्याला शेवट बसवले जात आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

पण राजकारणात थोडं कमी जास्त होत असते. मात्र आम्ही केवळ मंत्रिपदासाठीच गेलो नव्हतो. मंत्रीपद दिले तरी चांगले, नाही दिले तर त्याहून चांगले. पण मुख्यमंत्री म्हणाले, मी शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळणाऱ्यातील आहे. त्यावर माझा विश्वास आहे, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले. पुढील मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहितीही बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना दिली. पण याच मंत्रिमंडळाचा विस्तार ४० दिवसांनी झाला आहे, तर पुढचा विस्तार अडीच वर्षात होईल असे वाटते, असा खोचक टोलाही बच्चू कडू त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!