Share

राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरू होणार ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा!

Published On: 

मुंबई :  दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक काळापासून कोरोना संकटाशी जग सामना करत आहे. या काळात शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. बहुतेक विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑनलाईन पार पडले. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची समाधानकारक स्थिती पाहता, आता हळूहळू पाऊले टाकत शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आल्या आहेत. आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा पुन्हा सुरु होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु होणार असल्याचे घोषणा सुरु केलं आहे. राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरु होणार आहेत. तर 13 जूनला फक्त पहिलीच्या वर्गासाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा १५ जूनला सुरू होणार आहेत.

मागील काही दिवसात संपूर्णपणे कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शाळा पुन्हा सुरु होणार की नाही या बाबत शंका निर्माण झाली होती. मात्र शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शाळा सुरु होणार हे निश्चित झाले आहे.

“कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनचे सर्व नियम पाळूनच वर घेण्यास सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी शाळेत विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे.” असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!