🕒 1 min read
औरंगाबाद : मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे औरंगाबादला सभा घेत आहेत. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत भाषण करत भाजपवर निशाणा साधला.
“औरंगाबादमधील जनसमुदायाच्या लाटांचा फटका भाजपाला बसला तर पाणी मागायला देखील उठणार नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उठलेली जनतेची ही लाट दिल्लीला देखील झटका देईल. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच महागाई, इंधन दरवाढ यावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने आक्रोश मोर्चा काढला. मात्र भाजपच्या नामर्द लोकांनी काश्मीरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा. असा टोला संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांचा हिमरू शाल देऊन सत्कार करण्यात आला. आता उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरेंवर टीका केली तर…” ; चंद्रकांत खैरेंचा इशारा
- “रावसाहेब दानवेंचा राजकीय वध करू द्या” ; अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती
- सलमान खान धमकी प्रकरण, लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस पोहचले दिल्लीत
- मिताली राजने विश्वचषकात पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजांचे उडवले होते छक्के; वाचा!
- Aurangabad : मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेपूर्वीच राडा; पाणी प्रश्नांवर निवेदन देणाऱ्या भाजप नेत्यांना अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
