पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एन्ट्री केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी भाजपला चांगलेच निशाण्यावर धरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपला कोणत्याही युतीची गरज नसल्याचे वक्तव्य केले आहे.
आगामी काळात भाजप पक्ष इतका मजबूत करुया की, पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला ताकद देऊया. कोणत्याही युतीची आवश्यकता नाही, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना विसरलेली भाजपा ; त्यांनी केलेल्या महायुतीला तरी कशी जिवंत ठेवणार ? @PawarSpeaks साहेबांच्या मुळे @ShivSena ने यांना योग्य वेळी जागा दाखवली . सावधान ! कमळाच्या चिन्हावर लढणारी #रासपा #शिवसंग्राम #रिपाई शेवटच्या घटका मोजत आहे .. pic.twitter.com/Tibi8Oef0H
— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 23, 2021
स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब (Gopinath Munde) यांना विसरलेला भाजप, त्यांनी महायुतीला तरी कशी जिवंत ठेवणार?, असा प्रश्न करित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी भाजपवर टीका केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, की शरद पवार साहेबांच्या (Sharad Pawar) मुळे शिवसेनेने (Shivsena) यांना योग्य वेळी जागा दाखवली. सावधन! कमळाच्या चिन्हावर लढणारी राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष हे शेवटचा घटका मोजत आहेत, अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अन् नितेश राणेंनी काढला ‘म्याव म्याव…’ आवाज, वाचा सविस्तर
- अधिवेशनादरम्यान मास्क न लावणाऱ्यांना अजित पवारांनी चांगलंच खडसावलं
- राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचं कसं?; फडणवीसांचा मलिकांना टोला
- त्यांना माझा बाप काढून काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांची आव्हाडांवर आगपाखड
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत


