🕒 1 min read
नागपूर : हिवाळी अधिवेशनाला (Winter session) आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) अधिवेशनाला आले नाहीत. यावरुन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री अधिवेशनाला आले नाहीत यात काही नवीन घडतंय अस काही नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात किती वेळा आले? राज्यात किती दौरे केले? राज्यावरील संकटात ते कधी बाहेर पडले, असे प्रश्न केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उपस्थित केले आहेत. संघ मुख्यालयाला भेट देण्यासाठी ते आज नागपुरात आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आजारी आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आम्ही देवाला प्रार्थना करतो की, मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, आणि जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, असेही दानवे (Raosaheb Danve) म्हणाले आहेत.
दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन भाजपच्या अनेक नेत्यांनी भाष्य करत शिवसेनेला डिवचले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा सल्ला देत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेवराईतील वाळू प्रकरण विधानसभेत गाजले; महसूलमंत्र्यांकडून भरारी पथकांची स्थापना..!
- अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; पेडणेकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
- मोदींची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना तात्काळ निलंबित करा; देवेंद्र फडणवीस आक्रमक
- ‘मविआ’मध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- रुपाली पाटील ठोंबरे
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
