Share

बोगराची लढाई ही १९७१ च्या युद्धाचा सर्वाधिक रक्तरंजित अध्याय- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आजचा दिवस(१६ डिसें.)संपूर्ण भारतात ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे १६ डिसेंबर १९७१ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले होते. या युद्धादरम्यान आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहींदांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. या पार्श्वभूमीवरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी बोगराची लढाई ही १९७१ च्या युद्धाचा सर्वाधिक रक्तरंजित अध्याय होता, असे म्हंटले आहे.

यासंदर्भात पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बोगराची लढाई ही १९७१ च्या युद्धाचा सर्वाधिक रक्तरंजित अध्याय होता, तसेच ही या युद्धातील सर्वाधिक काळ चाललेली लढाई होती. बोगरा शहर ताब्यात घेण्यासाठी पराक्रमाची शर्थ करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन.’

पुढे ते म्हणाले आहेत की,’बांगलादेशमधील बोगरा शहरामध्ये पाकिस्तानने एक मोठे सामरिक आणि लष्करी केंद्र उभारले होते, त्यामुळे बोगरा शहर ताब्यात घेणे गरजेचे होते. बोगरा शहर जिंकल्यावर उत्तर बांगलादेशातील पाकिस्तानी सैन्याला उर्वरित पूर्व पाकिस्तानमधील सैन्यापासून तोडता आले असते. याच अनुषंगाने बोगरा शहर ताब्यात घेण्याची जबाबदारी मेजर जनरल लक्ष्मण सिंह यांच्या नेतृत्वातील २० इंडियन माऊंटन डिव्हिजनवर सोपवण्यात आली. भारत-पाक युद्धाची औपचारिक घोषणा होण्यापूर्वीच २३ नोव्हेंबर १९७१ रोजी बोगराच्या लढाईला सुरुवात झाली आणि पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतर देखील दोन दिवस म्हणजे १८ डिसेंबर १९७१ पर्यंत ही लढाई सुरु होती, म्हणूनच बोगराची लढाई १९७१ च्या भारत-पाक युद्धातील सर्वाधिक काळ चाललेली लढाई म्हणून ओळखली जाते.

दरम्यान, बोगराच्या लढाईमध्ये भारतमातेच्या सुपुत्रांनी दाखविलेल्या शौर्यासमोर पाकिस्तानी सैन्याचा एकही प्रयत्न कामी आला नाही. भारतीय सैन्याने बघताबघता एकामागून एक सर्व परिसर आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या इमारती ताब्यात घेतल्या. भारतीय रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या सर्व चौक्यांवर गोळीबार करून त्या उद्ध्वस्त केल्या. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या शरणागतीला सुरुवात झाली. बोगराची लढाई ही १९७१ च्या युद्धातील सर्वाधिक रक्तरंजित लढाई होती. या लढाईत शत्रूकडून क्रूरतेचा कळस गाठण्यात आला. ही लढाई प्रत्येक इंच जमिनीसाठी लढली गेली. बोगरा शहर ताब्यात घेणे हा भारतीय सैन्यासाठी ऐतिहासिक विजय होता, असेही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!