🕒 1 min read
बुलढाणा : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे (Pankja Munde) यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती, परंतु समर्थकांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय पुनर्वसन न झाल्याने पंकजा मुंडे यांची पक्षावरची नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आली आहे.
बुलढाण्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कोयंदे (Totaram Koyande) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. दरम्यान, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना 2 वर्षांनंतर विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे.
माझे माता-पिता, माझे सर्वस्व तुम्ही आहात. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईन, पण पदासाठी कुणासमोर हात पसरणार नाही. आमच्या रक्तातच तशी सवय नाही. ‘राजकारणात संधी मिळाली नाही, पण लोकांच्या सेवेची संधी सोडणार नाही’, अशी शपथ मी गोपीनाथ मुंडे यांना अग्नी देताना घेतली होती असे सांगतानाच पद असो वा नसो, जनतेच्या सेवेला प्राधान्य देईन. कार्यकर्त्यांना आणि जनतेला कधीच अंतर देणार नाही, असं पंकजा मुंडे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- लय भारी!! पुण्याचे महापौर ठरले देशातील सर्वाधिक लोकप्रिय
- ‘नियमांचे बडगे फक्त राजकीय विरोधकांना, बाकी सगळ्यांना मोकळे रान’, राऊतांचे टीकास्त्र
- शरद पवारांनंतर आता चंद्रकांत पाटलांचे पावसात भाषण
- ‘मविआ एसटी कर्मचाऱ्यांविरोधात दंड थोपटतंय हा पुरुषार्थ नाही’
- खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा- संजय राऊत
- मराठी साहित्याशी संबंध नसलेल्या जावेद अख्तरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचे औचित्य काय? भाजपचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
