🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले या मागील काही दिवसांपासून आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दिपाली सय्यद भोसले मागील काही दिवसांपासून सातत्याने टीका टिप्पणी करत आहेत. कधी पत्रकार परिषद घेऊन तर कधी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. दिपाली सय्यद भोसले हे आपल्या सडेतोड बोलण्यामुळे माध्यमाचे लक्ष वेधून घेत आहेत. आता दिपाली भोसले यांनी ट्वीट करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
भाजपने औरंगाबाद शहरात जल आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राऊसाहेब दानवे, केन्द्रीय मंत्री भागवत कराड हे उपस्थित होते. आता या जल आक्रोश मोर्चा वरून दिपाली सय्यद भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे. दिपाली सय्यद भोसले ट्विट करत म्हणाले की, “जल आक्रोश हे कारण नाही. साकळाई सिंचनाचे ८०० कोटीचा हिशेब नाही, फडणविस साहेब पैसे वापरले कुठे उत्तर द्या, नाहीतर माजी बोगस मुख्यमंत्री म्हनुन होकार द्या.” ट्विट मध्ये दिपाली भोसले यांनी फडणवीसांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जल आक्रोश हे कारण नाही .
साकळाई सिंचनाचे ८०० कोटीचा हिसाब नाही, फडनविस साहेब पैसे वापरले कुठे उत्तर द्या , नाहीतर माजी बोगस मुख्यमंत्री म्हनुन होकार द्या ! @ShivSena @Dev_Fadnavis @BJP4India— Deepali Sayed (@deepalisayed) May 23, 2022
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जवळपास ३५ गावांना साकळाई सिंचन प्रकल्प यासाठी दिपाली सय्यद भोसले यांनी यापूर्वीही आंदोलन केले होते. आता या सिंचन प्रकल्पात ८०० कोटींचा अनागोंदी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
