मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत आरोप, टोलेबाजी सुरू असते. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधाला आहे.
काय म्हणाले नारायण राणे ?
उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
नारायण राणे म्हणाले की, आशिष शेलार (Ashish Shelar) हे एक कवी पण आहेत. ते बोलता बोलता चाफा उगवेना, चाफा फुलेना असं बोलून गेले. पण उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही.
तसेच, त्या कार्यक्रमाच्यावेळी नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांना ‘पुरूषार्थ’ हे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. हे पुस्तक मला नाही उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे, असं म्हणत यावरूनही उद्धव ठाकरेंना राणेंनी लक्ष्य केलं.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर ती परिस्थिती कशी हाताळावी, जाणून घ्या!
- Chandrakant Khaire | “मी आता मैदानात उतरलोय, काय होईल…” चंद्रकांत खैरेंचा संदिपान भुमरे यांना इशारा
- Car Update | ‘या’ कार मध्ये आहेत सर्वोत्तम सनरुफ फिचर
- Shahajibapu Patil | “पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा…”, शहाजीबापू पाटलांचा इशारा
- Amit Shah | “अमित शहा सत्तेतील प्रभावशाली नेत्यांपैकी एक..” राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

