Share

‘मोदींप्रमाणेच ठाकरेंनीही फक्त बडबड केली’, खा.जलील यांची टीका

Published On: 

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या संवादावर औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. ‘बँकांच्या कर्जाचे हप्ते, वीजबिल, पालिका कर, इंधनावरील कर कमी करणे, कोरोना रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये मोफत उपचार आदींबाबत महत्त्वाच्या घोषणा करुन जनतेला दिलासा देतील असे वाटले होते. पण मोदींप्रमाणेच तुम्हीही फक्त बडबडच केली’, अशी टीका त्यांनी ट्विट करुन केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जलील यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करुन एक जूनपासून सर्व प्रकारचे उद्योगधंदे, बाजारपेठा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा प्रशासनाने दुकानांना लावलेले सील काढून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश द्यावेत. व्यापारी, दुकानदार, टपरीधारक सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. आस्थापना बंद असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक पॅकेज किंवा करांमध्ये सवलत दिलेली नाही, उलट शहरात प्रशासनाने एक प्रकारे हुकूमशाहीच चालवली आहे.

त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही खा.जलील यांनी घणाघाती टीका केली. ‘उद्धव ठाकरे हे फक्त टीव्हीवर येतात आणि ज्ञान देतात. त्यांना राज्याच्या हिताचा काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे, पण आम्ही १ जूननंतर दुकानं उघडणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दुकानदारांचे हप्ते आणि व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात यावं. नाहीतर आम्ही लॉकडाऊन असला तरी तो झुगारून दुकानं उघडू अशा थेट इशारा यावेळी इम्तियाज जलील यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!