Share

‘त्या’ ३० नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या केली!, गिरीश महाजनांनी मौन सोडले

Published On: 

जळगाव : ज्या नगरसेवकांना भाजपने संधी दिली, भाजपच्या जिवावर नगरसेवक बनविले, त्या नगरसेवकांनी भाजपला सोडून राजकीय आत्महत्या केली असून, लवकरच भाजपमधून फुटून गेलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

भाजपातील बंडखोर नगरसेवकांची संख्या वाढत चालल्याने माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री ९.३० वाजता तातडीची बैठक घेतली. ५७ वरून २७ वर घसरगुंडी झालेल्या भाजपच्या २४ नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘भाजपातून फुटणारे नगरसेवक राजकीय आत्महत्या करीत असून त्यांचे राजकीय अस्तित्व संपणार आहे. ज्या नगरसेवकांना पक्षाचे तिकिट देवून निवडून आले ते आयुष्यात नगरसेवक होऊ शकले नसते. सत्ता येते आणि जाते; परंतु फुटणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार हे अटळ आहे असा इशारा आमदार महाजनांनी दिला.

महाजन यांनी या बैठकीनंतर काही नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चादेखील केली. तसेच महापालिकेत सत्ता आणण्यासाठी पक्षाने जे प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांवर काही पैशांसाठी पाणी फिरू देऊ नका, असेही आवाहन महाजन यांनी केले. दरम्यान, १ जून रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी नगरसेवकांना काही सूचना दिल्या

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!