Share

कंगनावर कोणताच कायदा लागू होत नाही, असं कसं?, ‘या’ अभिनेत्याचा संतप्त सवाल

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असते. नुकतीच तिने भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून भीक असल्याचं म्हंटल होतं. तिच्या या वक्तव्यावरुन सर्व स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केलेल्या कृषी कायद्यांवरही भाष्य केलं होतं. पंतप्रधानांच्या निर्णयावर कंगनाने नाराजी दर्शवली होती. या वक्तव्यानंतर तिने आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कंगनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने संपूर्ण शीख समुदायाला खलिस्तानी म्हंटल आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य केलं आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तिच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. अभिनेता कमाल आर खान याने कंगनाच्या अटकेची मागणी केली आहे.

कंगना रणौत उघडपणे मारणे, कापणे आणि हिंसाचार याबद्दल बोलत असते. मात्र आतापर्यंत असा कोणताही कायदा नाही जो कंगनावर लागू होतो. असे कसे? इतर कोणी जर अशी पोस्ट केली असती तर तो आतापर्यंत जेलमध्ये असतात. कायदा सर्वांवर लागू होत नाही का? असे प्रश्न कमाल आर खानने उपस्थित केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!