🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : धनगर बांधवांच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभी राहिले आहे. त्यांच्या घोंगडी व काठीत मायेची उब आणि शक्ती सामावलेली आहे, असे म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनी मनोगत व्यक्त केले. मुंबई येथील शिवाजी पार्कवर रासपचा महा मेळावा रविवारी पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. त्यावेळी मुंडे बोलत होत्या.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनगर बांधवांच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभा राहिले आहे, त्यांच्या घोंगडी व काठीत मायेची उब आणि शक्ती सामावलेली आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना मंत्री करण्याचा आपण शब्द दिला होता तो पूर्ण केला. ते आज दुग्धविकास मंत्री आहेत.
तसेच धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मंत्रालयाची पायरी चढू शकणार नाही असे मी म्हणाले होते आणि त्यानंतर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आदिवासींच्या सवलती व कोट्यवधीचे बजेट सरकारने दिले, तथापि सत्तर वर्षे ज्या काॅग्रेस- राष्ट्रवादीने आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले, त्यांनी मात्र काहीही केले नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला.
दरम्यान या कार्यक्रमाला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. राहूल कुल, शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बालासाहेब दोडतले, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, सिने अभिनेत्री सपना बेदी, युवा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड आदी यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
- राष्ट्रवादीला कोकणात धक्का, माजी प्रदेशाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करणार
- उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
- सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचा भाजपमध्ये प्रवेश
- नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय


