🕒 1 min read
तिरुअनंतपुरम : देशात सर्वाधिक टोकाचे वाद काही निवडक मुद्द्यांवरुन होताना दिसतात. आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी असो की उद्योग-व्यवसाय किंवा अन्य कोणत्याही कामात सवलती, अनुदान किंवा आरक्षण मिळवण्यासाठी झटत असतात. यासाठी विविध समाजिक संघटनांच्याकडून वेगवेगळ्या वेळी विविध ठिकाणी आंदोलने देखील होत असतात. परंतु दारूचे दुकान हे एकमेव ठिकाण असे आहे की तिथे कुणी सवलत मागत नाही, अनुदानही मागत नाही किंवा आरक्षण ही मागत नाहीत, असं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
दारूच्या दुकानांबाहेर उभे असलेले मद्यपी ‘समतावादी’ आहेत. विशेष म्हणजे कोणीही कोणत्याही अनुदानाची किंवा आरक्षणाची मागणी करत नाही. तसेच, सर्व ग्राहक अशा दुकानांबाहेर धीराने आणि शांततेने रांगा लावताना दिसतात. आणि आपला नंबर येण्याची वाट पाहत असतात, असं केरळ उच्च न्यायालयाने एका निकालामध्ये म्हंटल आहे.
दारूच्या गुंत्या बाहेर गरिबी दिसत नाही. तेथे कोणालाही अनुदान किंवा आरक्षण नको आहे. हे सर्व जण अतिशय समतावादी आहे. प्रत्येकजण शांतपणे आणि संयमाने रांगेत उभा आहे. न्यायालयाने पुढे म्हटले की, या दुकानांबाहेरची गर्दी कमी करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे ‘वॉक इन शॉप’ होय. त्यासाठी इतर कोणत्याही दुकानाप्रमाणे बनवा. तसेच न्यायालयाने म्हटले की, दारूच्या दुकानांबाहेर लांब रांगा असल्याने अनेक सभ्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ किंवा कामाच्या ठिकाणी अशी दुकाने नको आहेत, असं न्यायमूर्ती दिवाण रामचंद्रन म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कंगनाला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा,’ शीख समुदायाची संतप्त मागणी
- पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही मिळाली?, चंद्रकांत पाटील म्हणाले…
- एकवेळ फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवेन, पण…- पंकजा मुंडे
- लय भारी!! पुण्याचे महापौर ठरले देशातील सर्वाधिक लोकप्रिय
- ‘नियमांचे बडगे फक्त राजकीय विरोधकांना, बाकी सगळ्यांना मोकळे रान’, राऊतांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
