🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पी. चिदंबरम यांनी या निर्णयाला धार्मिक रंग दिला आहे. त्यामुळे त्यांचावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम ३७० हटवलं असतं का ? असा प्रश्न उपस्थित केल आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शवत पी चिदंबरम यांनी भाजपावर टीका केली आहे. पुढे पोलताना त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये बहुसंख्य हिंदू असते तर कलम ३७० भाजपाने कधीही हटवलं नसतं असं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय मीडिया त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे असंही त्यांनी म्हटले आहे.
Former Union Minister & Congress leader P Chidambaram in Chennai: Had there been a Hindu majority in Kashmir, BJP wouldn't have touched it (Article 370), but because there is a Muslim majority in Kashmir, they abrogated it. (11.8.19) pic.twitter.com/CWpKgRMg0C
— ANI (@ANI) August 12, 2019
तसेच हा निर्णय घेताना विरोधकांनी विरोध दर्शवला नाही. आम्हाला बीजेडी, तृणमूल काँग्रेस, जद (यू), वायएसआर काँग्रेस, टीआरएस या पक्षांनी सहकार्य केले नाही कारण ते भाजपाला घाबरत आहेत असंही चिदंबरम यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरमधील परिस्थिती अशांत असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, मोदी सरकारने मोठा निर्णय घेत कलम ३७० काढून टाकले असून काश्मीर राज्याचे विभाजनही करण्यात आले आहे. यानुसार आता राज्याबाहेरील जनतेला काश्मीरमध्ये वास्तव्य करता येणार आहे. तसेच काश्मीर आणि लडाख यांना केंद्र्शाशित प्रदेशाचा दर्जाही देण्यात आला आहे.
अध्यक्षपद सोनिया गांधींकडे; कॉंग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय
भाजप २५० जागा जिंकणार, मग बाकीच्या जागांमध्ये आम्ही गोट्या खेळायच्या का ?’
सरकारला उशिरा सुचले शहाणपण; आता पूरग्रस्तांना रोख रक्कमेत दिली जाणार मदत
…म्हणून मी पूरग्रस्त भागाची पाहणी केली नाही : उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

