Share

ENG vs IND : कपिल देव यांना रोहितनं फटकारलं; विराटच्या ‘त्या’ वक्तव्यावर म्हणाला, ‘‘आत काय चाललंय…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) अंतिम टी-२० सामन्यातही कायम राहिली. असे असूनही, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा माजी कर्णधार कपिल देव यांच्या संघातील स्टार फलंदाजांच्या स्थानाबाबत केलेल्या टिप्पणीशी असहमत आहे. रोहित म्हणाला, ”ते तज्ञ बाहेरून खेळ पाहत आहे आणि आत काय चालले आहे ते कळत नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दोन सामन्यांमध्ये विराटला केवळ १२ धावा करता आल्या.”

कपिल देव यांनी अलीकडेच एका निवेदनात म्हटले होते, की जेव्हा क्रमांक दोनचा गोलंदाज असलेल्या आर अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, तर विराट कोहलीला टी-२० संघातून का वगळले जाऊ शकत नाही. तो सेटअपमध्ये बसत नाही. “जर विराट कामगिरी करत नसेल तर तुम्ही या मुलांना दीपक हुडा सारख्या तरुणांना बाहेर ठेवू शकत नाही.”

https://twitter.com/RevSportz/status/1546213021626028032

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, “तज्ञ बाहेरून खेळ पाहतात आणि आत काय चालले आहे हे त्यांना कळत नाही. आमची स्वतःची विचार प्रक्रिया आहे. आम्ही आमचा संघ बनवतो आणि त्यामागे खूप विचार आहे. आम्ही खेळाडूंना पाठिंबा देतो आणि संधी देतो. अशा परिस्थितीत तुम्हाला या गोष्टी बाहेरून कळत नाहीत. त्यामुळे बाहेर काय चाललंय हे महत्त्वाचं नसून आत काय घडतंय हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!