Share

ENG vs IND : ‘‘टक्कर मार दूं क्या ?”, ऋषभ पंतचा रोहित शर्माला सवाल; पाहा झालं काय!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील टी-२० मालिकेचे सामने सुरू आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ४९ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली. त्याचवेळी, या सामन्यादरम्यान ऋषभ पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो क्षेत्ररक्षकाला संबधून रोहित शर्माशी बोलत होते.

वास्तविक, इशान किशनला दुसऱ्या टी-२० सामन्यातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला. पंतने कर्णधार रोहित शर्मासोबत सलामी दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४.५ षटकात ४९ धावा केल्या. पंतने १५ चेंडूत २६ धावा केल्या.

https://twitter.com/time__square/status/1545764193101438978

फलंदाजी करताना पंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फलंदाजाला मारताना बोलत आहे. पहिल्याच षटकात धाव घेत असतानाच ऋषभ पंतच्या मधोमध एक इंग्लंडचा क्षेत्ररक्षक आला आणि त्यानंतर त्याने असे म्हटले. पंतने रोहित शर्माला सांगितले, ”सामने आ गया था यार, टक्कर मार दूं क्या?”

भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ४९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. आता या मालिकेत आणखी एक सामना शिल्लक आहे. प्रथम खेळताना टीम इंडियाने ८ गड्यांच्या मोबदल्यात १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडचा संघ १७ षटकांत १२१ धावा करून बाद झाला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!