मुंबई : भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीतील एकेकाळचा भरवश्याचा फलंदाज असणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा वाईट फॉर्म हा अजूनही कायम असल्याचे सध्या दिसून येत आहे. चेतेश्वर पुजाराचा 2022 मधील रणजी स्पर्धेतील खराब फॉर्म अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.
सध्या देशांतर्गत महत्वाची क्रिकेट स्पर्धा असणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला आहे. सध्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी स्पर्धेतील सामना चालू आहे. पुजारा सध्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पण खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे चेतेश्वर पुजाराने आधी देशांतर्गत रणजी स्पर्धेत चांगले खेळून दाखवावे आणि मग नंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करावे असा सल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला होता. चेतेश्वर पुजारा बरोबरच अजिंक्य राहणे याला पण रणजी क्रिकेट स्पर्धा खेळावी असा सल्ला सौरव गांगुली यांनी दिला होता.
अजिंक्य राहणे याने पहिल्या रणजी सामन्यात उत्तम कामगिरी केली ;मात्र चेतेश्वर पुजाराला आपल्या फलंदाजीची छाप पाडता आली नाहीये. मुंबई विरुद्ध सौराष्ट्र या दोन संघात रणजी क्रिकेट सामना चालू आहे. मुंबईकडून फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे याने १२९ धावांची अतिशय अप्रतिम फलंदाजी केली, मात्र खराब फॉर्ममधून झगडणारा चेतेश्वर पुजारा याला आपल्या फलंदाजीची छाप पाडता आली नाहीये.त्यामुळे त्याला कदाचित आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागू शकते .
महत्वाच्या बातम्या :
- Shiv Jayanti 2022 : “जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती, तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही” – देवेंद्र फडणवीस
- एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून असे कृत्य होणे हे अतिशय निंदनीय- रुपाली चाकणकर
- Shiv Jayanti 2022 : सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून साकारण्यात आली शिवप्रतीमेची छबी
- छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला तो म्हणजे ‘स्वाभिमान’ – संजय राऊत
- IND vs WI: हे काय! अय्यरच्या त्या चौकाराने भारतीय खेळाडूंना पळवले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

